कविता

पवन शिन्दे's picture

फितुर


जेव्हा आपलीच माणसं
फितुर होतात
तेव्हा स्वातंत्र्यासाठी माणसं
आतुर होतात..

हा ईतिहास सांगीतला
आहे क्रांतीविरांनी
हा ईतिहास घडविला
आहे फितुरानी...

आपलं आपलं म्हणूनच ते
घात करतात
अगदी अलगद परक्याच्या हातात
हात देतात..

जेव्हा आपलीच माणसं
फितुर होतात
तेव्हा स्वातंत्र्यासाठी माणसं
आतुर होतात..

पवन शिन्दे

अर्धवट's picture

बाजीप्रभूंचा पोवाडा – पावनखिंड बलिदानाचा आज ३५०वा स्मृतीदिन – तेजोनिधी सावरकर


१२ जुलै १६६० च्या रात्री महाराज, बाजीप्रभू आणी सहाशे मावळे जीवावर उदार होऊन, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर पडले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.

सोप्या's picture

जूनीच कथा ...... पण नविन ढंगात


कावळा आणि चिमणी

कावळा आणि चिमणी
रहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी
कावळ्याचं घर होतं शेणाचे
चिमणीचं घर होतं मेणाचे
एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरुन गेला
कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून
"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिल्लू आहे छोटं वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला

अर्धवट's picture

ओंगळ समस्त, आम्ही नंगे...


कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेची माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे..

प्रीतमोहर's picture

कविता/ गाण्यातला भावलेला विचार/कल्पना


अनेक वेळा एखादं गाणं ऐकताना एखादी ओळ, विचार, त्यातली कल्पना मनाला भिडते आणि आपल्या तोंडुन अहाहा, क्या बात! अस नकळत बाहेर पडत. इथे तुम्हाला भावलेल्या कल्पना, विचार लिहा.

Unless it is required, कॄपया अख्खी कविता लिहु नका. तो विचार का आवडला ते ही लिहा. तुम्हाला वेगळा अर्थ समजला असेल तर तो (पाल्हाळीक न लावता ) लिहा

ऋषिकेश's picture

आज पुन्हा मरणास पाहिले


मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.

अवलिया's picture

कोरी पाटी


बरेच दिवसांत नाना भेटला नाही. आज जाऊ उद्या जावु करता करता काल संध्याकाळी वेळ मिळाला. नानाच्या घरापाशी गेलो. असेल की बाहेर गेला असेल याचा विचार करतच बेल दाबली. नाना कुठे कधी असेल आणि काय करत असेल याचा काहीच भरवसा नाही. दार उघडले तर नानाच समोर होता.

इस्किलार's picture

"बालकवि" ~ निसर्गसौंदर्यात रममाण होण्याची तीव्र तळमळ !


"५ मे" ~ बालकविंचा हा स्मृती दिन (१९१८ च्या या तारखेस त्यांचा अपघाती म्रुत्यु झाला होता.)आज आकाशवाणीवर बालकवि यांच्याविषयी एक खास कार्यक्रम सादर करण्यात आला, जो अगदी योगायोगाने मला ऎकायला मिळाला. निवेदक बालकविंच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवत होते इतक्या तन्मयतेने त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या वेळेत या जादुगाराचे मराठी भाषेतील योगदान प्रस्तुत केले.

राजेश घासकडवी's picture

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते


कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते

राजेश घासकडवी's picture

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते


मीमराठी वरील वाचकांना माझा नमस्कार. हा लेख सुमारे तीन आठवड्यांपूर्वी इतरत्र प्रसिद्ध झाला होता, व तुमच्यापैकी काहींनी तो वाचलाही असेल. (नावं तीच दिसतात, पण आयड्यांचा काय भरवसा? शिवाय न वाचता प्रतिसाद देणारेही असतातच ना.) पहिलाच लेख इथे लिहिताना शिळ्या कढीला ऊत आणायचा उद्योग केल्याबद्दल क्षमस्व.