भारताचे शत्रू कोण? : प्रारंभ

0
0

मित्रांनो,

भारताची सध्याची सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अगदी कंगाल अवस्थेत आहे. मला वाटलेले, पटलेले, सुचलेले विचार तुमच्यापुढे मांडत आहे. माझी मते तुम्हाला पटतील न पटतील. पण या अतिशय संवेदनशील विषयावर काहितरी कृती होणे नक्की गरजेचे आहे. देश चहू बाजूंनी शत्रूंनी घेरला जात असताना, शत्रूच्या कारवाया उघड्या डोळ्यांना दिसत असताना, शत्रू प्रबळ होत असताना केवळ मला काय त्याचे ही बघ्याची भूमिका सध्याचे केंद्र सरकार घेत आहे हे उघड उघड दिसते आहे. सर्वसामान्य जनतेला कळते आहे. तरीही जनतेचा विश्वास जपण्यासाठी सरकार कडून कोणतीही हालचाल दिसत नाहीये. या चिंतनातून या लेखमालेचा उद्भव झाला असे म्हटले तरी चालेल.
अनेक विषय आहेत. त्यांचा माझ्या कुवतीप्रमाणे परामर्श घेईनच. पण या विचारांत तुम्हा सर्व बुद्धीवंतांचे योगदान सकारात्मक चर्चेने सहभाग अपेक्षित आहे. या लेखमालेत मी ढोबळमानाने पुढील विषय हाताळेन
- चीनचे वाढते संकट
- पाकिस्तान - चोराच्या उलट्या बोंबा
- बांगलादेश - एक संधी की अडचण?
- श्रीलंका - सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा - पण मित्र की शत्रू
- नेपाळ - हळूहळू ड्रॅगनच्या पंज्याखाली
- भारतातील संवेदनशील टापू
- भारताचे संरक्षण धोरण (भू, वायू व आकाश)
- भारताचे परराष्ट्र धोरण
- काश्मीर एक अश्वत्थाम्याची जखम
- कॉमनवेल्थ गेम्स
- भ्रष्ट्राचार व राजकारण
- रशिया निती
- युरोपिय देशांशी संबंध
- इंग्लंडचे महत्त्व

असा सर्वसाधारण मनात आलेला विचार आहे. हळूहळू आम्ही त्यातील विषय वाढवूच.
सुरुवातीला एवढा संक्षिप्त आलेख पुरेसा आहे.

प्रारंभः

भारताची फाळणी १९४७ साली झाली आणि लाखोंच्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक स्थलांतरीत झाले. याबाबतीत एक स्पष्टपणे नमूद करायचे आहे की भारताची फाळणी जी झाली ती मुख्य करुन मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे या मागणीच्या पूर्ततेसाठी झाली होती. भारताच्या फाळणीमागे सूर्यप्रकाशाएवढे एवढे स्पष्ट उद्दिष्ट असतानाही महात्मा गांधींनी ज्या मुसलमानांना भारतात रहायचे आहे त्यांनी भारतात रहावे हा अट्टाहास का धरला होता याचे कारण त्यांनाच माहिती. पण देशाचे तुकडे करणे हे मुळात धर्मावर आधारित असताना ही खेळी म्हणजे गांधीजींची एक मोठी राजकीय चूकच म्हणावी लागेल. 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात डोकावले की कोणालाही लक्षात येईल की गांधीजींच्या प्रयोगांची केव्हढी मोठी किंमत हिंदुस्थानाला चुकवावी लागली आहे. धर्मावर आधारित विभागण्या त्याप्रमाणे झाल्या असत्या तर आज भारतात खरेच खूप शांती असती. किंवा आपल्यापुढचे विषय वेगळे असते. कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोटांत मृत्यू, धार्मिक दंगे, असे केले तर मुसलमानांना काय वाटेल? असल्या टांगत्या तलवारीखाली जगावे लागले नसते.

सध्या देशात एक प्रचंड संशयाचे वातावरण आहे. हिंदु मुसलमानाकडे साशंकपणे का होईना पण सद्भावनेने बघत जरी असला तरी मुसलमानांकडून तो भाव दिसत नाही. कारणे काही असोत. पण १,००० वर्षे हिंदूंवर राज्य केले असल्याच्या रम्य इतिहासाची स्वप्ने पुन्हा काही माथेफिरु इस्लामी नेत्यांना पडू लागली आहेत. अशा माथेफिरु मुस्लिमांना पुन्हा हिंदुंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली करायच्या आहेत, पुन्हा मंदिरे फोडून मशिदी उभारायच्या आहेत. पुन्हा हिंदूंच्या स्त्रियांना जबरदस्तीने भोगायचे आहे. त्यासाठी मिळेल त्या क्षेत्रांत दहशतीचे तंत्र सर्रासपणे ते वापरत आहेत. मग ते फिल्म इंडस्ट्री मध्ये मुस्लिम हिरोंचा दबदबा टिकवण्यासाठी असो, वा संगीत क्षेत्रांत पाकीस्तानी गायकांनाच चांगली गाणी मिळतील यासाठीचा कटाक्ष असो, लव जिहाद असो, ठीक ठीकाणी मशिदी उभारणे असो, धर्माच्या नावाखाली रस्त्यांवर नमाज पढणे असो. वा कोणते फतवे असोत. इस्लामी नेत्यांचे सर्वसामान्य मुस्लिम जनतेला केले जाणारे मार्गदर्शन हे धर्मांधतेचे लक्षण आहे. या धर्मांध स्वप्नाचे पडसाद आपल्या आजूबाजूला उमटत आहेत. पण आपण डोळे झाकून बसलो तर आपल्या घराची आहुति त्यात पडल्याशिवाय राहणार नाही.

लव्ह जिहाद ही काही केवळ कपोल कल्पित कल्पना आहे असे मला तरी वाटत नाही. समाजात कित्येक उदाहरणे आहेत. कोण त्यांतून शहाणे झाले कोण फसले हा वेगळा विषय आहे. पण समाजाच्या सर्वच थरांतून हिंदू मुलींना मुसलमान मुले आवडण्याचे प्रमाण अचानक कधी नव्हे तेवढे वाढू लागले आहे. प्राचीन धर्मग्रंथांत म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा समाज भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजाचा धर्म भ्रष्ट होतो, जेव्हा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजातील स्त्रीयांचे शील भ्रष्ट होते, ही सुरुवात थोपवता आली नाही तर समाजाचे अधःपतन निश्चित आहे. हिंदू स्त्रियांनी वैयक्तीक विचार करण्याची देखील खूप गरज आहे. मुख्य म्हणजे आजच्या स्त्रिया सुशिक्षित आहेत स्वतंत्र प्रज्ञेच्या धनी आहेत. प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात हे मान्य पण आपण काय करतो आहोत याचा थोडा विचार केला तरी त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येईन. समाजात आता त्याची मोठ्या प्रमाणावर उदाहरणे यायला सुरुवात झाली आहेत

सैफ अली खान ने करिना कपूर साठी अमृता सिंग ला सोडले ( २ मुले झाली असूनही)
मोहम्मद अझरुद्दीन ने संगीता बिजलानीला ज्वाला गुट्टा साठी सोडले (त्यांनाही मुले आहेत) (ज्वाला गुट्टाने चेतन आनंदला सोडले)
अरबाज खानची बायको मलाईका अरोरा
अमृता अरोरा चा नवरा शकील लडाक
सलमान रश्दीची बायको पद्मा
शाहरुख खानची बायको गौरी
हीच स्टोरी टीव्ही सिरियल्स मधून कामे करणार्‍या कलाकारांमध्येदेखील दिसते.
अदनान सामी राणी मुखर्जीच्या मागे होता (शेवटच्या क्षणी फिसकटलेली गोष्ट)
सलमान खान ऐश्वर्या राय च्या मागे होता. (ही कहाणीपण ऐन वेळी फिसकटलेली)
हिंदू पुरुष आणि मुसलमान स्त्री अशा जोड्या समाजातील सर्वच थरांत किती दिसतात? बघा थोडा विचार करा.

मला कट्टर हिंदूत्व आणि कट्टर इस्लाम या वादांत नाही पडायचय. पण समाजात आपल्यासमोर काय चाललं आहे हे दाखवून द्यायचा हा प्रयत्न आहे. वरील उदाहरणे फक्त ग्लॅमर विश्वातील आहेत. पण अनेक ख्यातनाम कंपन्यांत मोठ्या पदांवर असलेल्या स्त्रियांचे नवरे मुस्लिम आहेत. अथवा मुस्लिम पुरुषांच्या बायका हिंदू आहेत. तुम्ही रहात असलेल्या छोट्या मोठ्या मोहल्ल्यातील एखादी तरुण मुलगी गायब होते व मुसलमान बॉयफ्रेंड बरोबर लग्न करुन प्रकट होते. या कायद्याच्या चौकटीत घडत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांची तीव्रता आपल्याला जाणवत नसेन तर येणारा काळ कठीण आहे एवढे नक्की सांगता येईल.

हा उदारपणा (गांधीजीच्या भाषेतील सर्वधर्मसमभाव) फक्त हिंदूंच्याच स्त्रिया का दाखवतात? क्षणिक सुख आज आपल्या जीवनात एवढे मोठे झाले आहे? की एक सामाजिक जबाबदारी पण आपण नाकारतो आहोत? समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. हिंदूंच्या स्त्रियांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होण्याची गरज आहे.
थोडेसे आत्मपरिक्षण आपल्याला आत्मग्लानीतून बाहेर आणू शकेल. बघा विचार करा आणि समाज वाचवा.

लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण अजून खूप ज्वलंत प्रश्न आहेत.
तूर्तास इथेच थांबतो. पुढची भेट पुढच्या लेखात. चीन बद्दल....

हा लेख

1

सनातन अथवा विवेकवाल्यांचा लेख वाटतो आहे.! असो ,विनोदाचा भाग सोडा, आपले निरि़क्षण योग्य आहे ह्यात वाद नाही. पण आप्न दिलेली उदाहरणे खूपच हाय प्रोफाइल आहेत.त्यात सर्व मुस्लिम हिरोंचा-"चला,हिंदु मुलीना पटवा' असा काही प्लॉट असेल असे वातत नाही.ते क्षेत्रच तसे आहे.

प्रियाजी, मी सनातन वा विवेक

2

प्रियाजी,

मी सनातन वा विवेक वा कोणत्याही तत्सम कट्टर हिंदुवादी संस्थेचा प्रतिनिधी वा समर्थक नाही हे आधीच स्पष्ट करतो.

उदाहरणे हाय प्रोफाईल दिसत असली तरी लेखात म्हटल्याप्रमाणे हे चित्र समाजातील सर्वच थरांतून दिसते आहे. मी स्वतः २ मुलींना तसे करण्यापासून परावृत्त केले आहे आणि त्याबद्दल त्यांनी मला मनापासून धन्यवाद दिले आहेत. कारण प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या त्या २ मुलींच्या मुस्लिम बॉयफ्रेंड्स नी १ वर्षांच्या आत दुसर्‍या हिंदू मुलींशी लग्ने केलेली आहेत.

दुर्दैवाने जोपर्यंत स्वतःला झळ पोहोचत नाही तोपर्यंत या प्रश्नाचे गांभीर्य कोणाच्या लक्षात येत नाही ही अगदी खरी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर अशा घटना पाहील्या नसतील तर तुमचे मत तुमच्या परीने योग्यच आहे. अशा घटनांचे प्रमाण वाढते आहे हे मात्र नक्की

भारताचे शत्रू कोण? संसदेत जे

3

भारताचे शत्रू कोण?

संसदेत जे खासदार बसतात ते सगळे..!


सहमत आहे

4

तात्याराव, हा विषय पण मी घेणार आहे या लेखमालेत. पण अजून वेळ आहे

वाचतो आहे व नेमकं तुम्हाला

5

वाचतो आहे व नेमकं तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आंतरजातीय विवाह झालेल्या

6

आंतरजातीय विवाह झालेल्या मुलींमध्ये नैराश्य जास्त प्रमाणात आढळते असे माझ्या अनेक मित्र मैत्रिणीबरोबर चर्चा केल्यानंतर समजले. घटस्फोटाचे प्रमाण हि अधिक आहे.
माझ्या निरीक्षणानुसार ह्या अश्या मंडळीचे खोटे बोल बचन भारी असते.

जन्मदात्या, त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवणाऱ्या आई-वडलांना फाटा दाखवतात. मग नंतर वाईट अनुभव येतो. पण तो पर्यंत उशीर झाला असतो. हि मंडळी अशांचा मानसिक - शारीरिक असा यथामती - यथाशक्ती मनसोक्त वापर करतात. पण मग नंतर घराचा रस्ता दाखवतात.आज-काल असे ऐकिवात आहे कि प्रथम mms बनवून नंतर आपल्या मित्रांशी संबंध ठेवण्यास भाग पाडतात मग इतके होऊन देखील तो mms नेट वर जाहीर होतो.

बिचाऱ्या आई - वडलांची नाहक बदनामी.....

हिंदू मुलींचेच यात भरडणे जास्त प्रमाणात आहे.
अर्थात सर्वच माणसे एकसारखी नसतात.. पण होणारा अन्याय या एकाच धर्मावर का होतो हे आज जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर पारशी समाजाचे उदाहरण समोर आहेच.
हे चिथावणीखोर लेखन नसून सत्य-परिस्तिथी आहे. वर नमूद केल्या प्रमाणे स्वतावर किंवा आजू बाजूला घडल्या - बेतल्या शिवाय याचा प्रत्यय येत नाही...


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

तुम्ही जर धर्म हा विषय बाजूला

7
तुम्ही जर धर्म हा विषय बाजूला ठेऊन बाकी मुद्द्यावर चर्चा केली तर ती ही मीमवरील सर्वांत महत्वपुर्ण चर्चा होईल ह्यात शंकाच नाहीत. चीनचे वाढते संकट - पाकिस्तान - चोराच्या उलट्या बोंबा - बांगलादेश - एक संधी की अडचण? - श्रीलंका - सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा - पण मित्र की शत्रू - नेपाळ - हळूहळू ड्रॅगनच्या पंज्याखाली - भारतातील संवेदनशील टापू - भारताचे संरक्षण धोरण (भू, वायू व आकाश) - भारताचे परराष्ट्र धोरण - काश्मीर एक अश्वत्थाम्याची जखम - कॉमनवेल्थ गेम्स - भ्रष्ट्राचार व राजकारण - रशिया निती - युरोपिय देशांशी संबंध ह्या मुद्याची वाट पाहतो आहे.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

इतर सर्व मुद्द्यांइतका सदर

8

इतर सर्व मुद्द्यांइतका सदर चर्चेतला मुद्दाही महत्वाचा आहेच हे ध्यानात घेणे.


-पुण्याचे पेशवे

म्ग

9

मग भारताचे शत्र कोण ह्यापेक्षा हिंदुंचे शत्रु कोण हे शीषर्क समर्पक होईल काय?
भारतप्रेमी प्रिया

सहमती - असहमती

10

एक मुद्दा वगळता बाकी सर्व मुद्दयांवर चर्चा व्हावी यावर सभासदांचे एकमत दिसतय.

तो मुद्दा सर्वात शेवटी चर्चेला घ्या, म्हणजे त्याच्यासाठी महत्वाचे मुद्दे बाजूला पडणार नाहीत.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

बाकीचे मुद्दे देखील महत्वाचे

11

बाकीचे मुद्दे देखील महत्वाचे आहेत !
त्या चर्चेला घ्या.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

घेतो आहे चीनचा विषय

12

हो बाकीचे मुद्दे घेतोच आहे. माझे विचार आत्ताच मांडले आहेत यावर, आता चीनकडे वळतो.
थोडा आढावा घेऊन लेखन करेन. शक्यतो आजच नाहीतर उद्या.

प्रियाजी, भारतप्रेमी आपण

13

प्रियाजी,

भारतप्रेमी आपण सर्वच आहोत यात शंका नाही. हा मुद्दा धार्मिक दिसत असला तरी मुख्य करुन धर्मापेक्षा आक्रमणाचा आहे.
मुसलमान कुठून भारतात आले?
दीड हजार वर्षांपूर्वी भारतात इस्लाम धर्माचा एक तरी माणूस होता का?
आणि आज हिंदूच हिंदूंच्या देशात अल्पसंख्य होण्याच्या वाटेवर आहेत. जनगणनेची फुगत जाणार्‍या आकडेवारी कडे नजर टाका मला बोलायची गरजच पडणार नाही. हम दो हमारा एक हे फक्त हिंदूंसाठीच का? नसबंदी फक्त हिंदूंसाठीच का? तुम्ही धर्म बाजूला सोडा. पण समाजाच्या एकाच धर्म विशेष जनसमूहाला केंद्रीत करुन का या गोष्टी केल्या जातात हेही पहा. म्हणजे त्यातील वेदना आपोआप लक्षात येतील.

भारतात घुसून मुसलमानांनी १,००० वर्षे भारतात धुमाकुळ घातला. हजारो मंदीरे फोडली व त्याजागी मशिदी उभारल्या. अयोध्येचे राममंदीर हे एक ज्वलंत उदाहरण नाही का?
लाखो स्त्रियांवर बलात्कार केले गेले. लाखो माणसांची गुरांसारखी कत्तल केली गेली.
मेले ते सर्व कोण होते? हिंदूच होते ना?
भारतात जैन, बौद्ध आणि शीख या पंथांचा उदय झाला पण त्याचे मूळ भारतातलेच होते. भगवान बुद्ध, माहावीर यांनी त्याकाळी ज्या थोर तत्त्वांचा स्वीकार केला त्याचे मूळ वेद आणि गीता यांमध्येच आहे. त्यामुळे जैन आणि बौद्ध या पंथांची जी विचारधारा आहे त्याचे मूळ भारतीय आहे. तीच गोष्ट शीखांचीदेखील.
या पंथांसारखे मुसलमान धर्माचे मूळ भारतात नसून भारताच्या ही पलिकडे आहे. जेरुसलेम ज्यावरुन मुसलमान व ख्रिश्चन कायम भांडत असतात. ज्या धर्माचे मूळ आपल्या मातीत नाही तो धर्म आपल्या मातीत अफाट वेगाने वाढतो कसा? हा प्रश्नही आपल्याला पडत नाही?

कोणताही धर्म श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो, तो श्रेष्ठ वा कनिष्ठ करण्याचे काम करतो ते समाज. आपण मूग गिळून बसलो तर आपले अनन्वित हाल हे ठरलेलेच आहेत. निरिक्षण करा , आपोआप स्पष्ट आणि स्वच्छ दिसत जाईन.

दुर्दैवाने या ही गोष्टींची झळ जोपर्यंत स्वतःला बसत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्यही लक्षात येत नाही. आणि जेव्हा सगळे कळते तेव्हा हातात काही उरत नाही. अनन्वित अत्याचारांना सामोरे जाणे नाहीतर जोहार (जो लाखो मानी राजपूत स्त्रियांनी केला) नशीबी येतो.

गांधीजींच्याच आत्मकथनात 'माझे सत्याचे प्रयोग' प्रत्येक प्रयोग तुम्ही दुसर्‍या अंगाने वाचा. बघा गांधीजींच्या प्रयोगांची देशाने काय किंमत मोजली आहे ती.

चांगल्या दिशेने चर्चा चालू आहे. आनंद आहे आम्हाला