प्यार हुआ इकरार हुआ...

0
0

कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही.

फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास. फुलामधले सुगंधीपरागकण श्वासोच्छ्वासावाटे घ्राणेंद्रियात विशिष्ट जागी जातात. त्यामुळे मेंदुमधील विशिष्ट जागेला काही संवेदना पोहोचतात. त्यामुळे आपल्याला वास येतो. पुर्वसंस्कारांमुळे विशिष्ट वास चांगला आणि वाईट असं वर्गीकरण होवुन आपल्यास आनंद वा त्रास होतो.. इत्यादी कवतिकं हवीत कशाला ? आपण सामान्य माणसं. आपली बुद्धि येवढी नाही. येवढा विचार करेपर्यंत हातातले फुल सुकुन जाणार, अत्तर उडुन जाणार. नकोच तो वाह्यातपणा.

तर मुद्दा होता गाण्याचा. काल संध्याकाळी फिरत फिरत येत असतांना अचानक स्वर आले.

"प्यार हुआ इक़रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल"

खरंय. प्रेम कुणावर जडावं याचा काही नेम नसतो. आजुबाजुला अनेक सुंदर सुंदर चेहरे असतात, पण सगळेच आवडतात असं नाही. आवडलेला चेहरा रुढार्थाने सुंदर असतोच असे नाही. मनाला काय आवडेल हे सांगणे खुप मुश्किल असते. कित्येक वेळा मनाला आवडलेले मुखातुन बाहेर पडेलच असे नाही. मग मुक प्रेमाचा खेळ चालतो आणि अप्राप्यतेच्या ज्ञानाबरोबर संपुन जातो. नंतर कधी तरी कळतं कदाचित जमलं असतं. पण उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रेम जडणं सोपं असतं आणि ते सांगणं मात्र खुप अवघड असतं. खरं प्रेम अबोल असतं असं म्हणतात. डोळ्यांनी डोळ‍यांची भाषा, चेहरा समजतो असं म्हणतात. पण काय असेल ते असो. काही जण नशीबवान असतात. त्यांचं प्रेम जडतं. समोरच्याला सांगितलं पण जातं. आणि काय गंमत की समोरुन चक्क होकार सुद्धा येतो. पण इथंच कुठंतरी भय सुद्धा वाढायला लागतं. भय कसलं असतं हे ? अज्ञाताचं? पण तसा तर येणारा प्रत्येक क्षण अज्ञात असतो. तरी आपण फार भय बाळगत नाही. मग प्रेमात पडलेल्यालाच का भय वाटावे ? मला तरी अजुन नीटसं उत्तर मिळालेले नाही. पण पुढचे बोल ते भय सांगुन गेले

"कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ".

खरंच ! एकत्र रहायचे, जीवन जगायचे तर ठरवले आहे. पण पुढे काय कसे होईल माहित नाही, घरचे परवानगी देतील का? समाज मानेल का ? आणि जर घरच्यांनी परवानगी नाही दिली तर काय करायचे? पळुन जायचे ? मग आजवर त्यांच्या असलेल्या ऋणानुबंधांचे काय? त्यांनी काही स्वप्न पाहिलेली असतील, कदाचित त्यांना आपल्यापेक्षा भल्याबु-याची अधिक जाण असेल. पण आपण तर एकत्र रहायचे ठरवले आहे. त्याचे काय? एकमेकांना वचन देउन बसलो आहे. त्याचे काय ? कुठे घेवुन जाणार आहे जीवन आपल्याला ? आयुष्याचे ध्येय काय ? एक ना अनेक प्रश्न केवळ त्या एका प्रेमामुळे उभे राहिले आहेत.

पण भय केवळ इतकेच नाही. मनापासुन ज्याच्यावर प्रेम केले. आपल्या सुखदुःखाचा साथीदार ज्याला मानले, आयुष्याचा पुढला काल ज्याच्याबरोबर व्यतीत करायचे ठरवले तो आणि आपण मिळुन चालत असलेला रस्ता, वाट, त्या रस्त्याने जे एकसुर एकतानतेने निर्व्याज बंधनाचे गीत गात आहोत ते तर बदलणार नाही? न जाणो रस्त्यातल्या मोहमयी वाटांचे आकर्षण वाटुन जोडीदार आपल्याला सोडुन दुस-याच वाटेने निघुन जाणार तर नाही? भय सुखाचे किंवा दुःखाचे नाही, तर भय आहे एकाकी पडण्याचे, एकटेपणाचे. जे आयुष्य एकत्रित व्यतीत करायचे ठरवले आहे ते अचानक दोन रस्त्यात विभागले तर जाणार नाही ? मग समोरच्याला बजावुन सांगितले जाते. प्रेम तुटले तर तो प्रेमिकांचा साथीदार चंद्र, तो चांद तो सुद्धा म्लान होईल. त्याला सुद्धा हे आवडणार नाही, तो चमकणारच नाही.

कहो कि अपनी प्रीत का, गीत न बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का, मीत न बदलेगा कभी
प्यार जो टूटा, साथ जो छूटा चाँद न चमकेगा कभी

पण ही अवस्था फार काळ टिकत नाही. दोघांनाही परस्परांवर विश्वास आहे. परस्परांबद्दल प्रेम आहे. आपले प्रेम चुकीच्या स्थानी नाही याची दोघांनाही जाणीव आहे. मग एकमेकांना खात्रीपुर्वक सांगतात की आपली कहाणी ही आता केवळ आपली कहाणी नाही. ही केवळ तुझी माझी प्रेम कथा नाही. तर ही कथा आता सगळ्या जगाची आहे. आणि ती जगाला सांगणार आहे ही रात्र. आपल्या दशदिशांमधल्या अंधकाराला दुर सारत आशेचा किरण पसरवत रात्र आपली कथा जगाला ऐकवेल. आपल्या प्रेमाच्या पावलांवर पाउल टाकत येणारी पिढी परस्परांवर प्रेम विश्वास दर्शवत त्याच पद्धतीने प्रेमाचा अंगिकार करेल आणि आयुष्याच्या वाटेवर सुखदुःखांचा सामना करत, वाटचाल करेल. आणि मग मी नसेल, तु नसेल पण तुझ्या माझ्या प्रेमाच्या खुणा या पृथ्वीवर वास करतील. जीवन चालुच राहेल.

रातों दसों दिशाओं से, कहेंगी अपनी कहानीयाँ
प्रीत हमारे प्यार की, दोहराएंगी जवानीयाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे फिर भी रहेंगी निशानीयाँ

प्रेमामधला दुर्दम्य आशावाद, भयार्तता पण तरीही न ढळलेला विश्वास, आणि सुख येवो दुःख येवो साथ सोडायची नाही ही परस्परांना दिलेली वचने, आणि जगाचे राहणारे सातत्य जपण्याची धडपड.

पण आता जग बदलले आहे. तो आणि ती पुर्वीसारखे राहिले नाहीत. आता ध्येय आधी ठरवुन त्यानुसार जोडीदार निवडला जातो. ध्येयापुर्तीला बाधा ठरणारे जोडीदार मेलेल्या उंदराला धरुन बाजुला फेकावे त्याप्रमाणे फेकुन दिले जातात, अडगळीत टाकले जातात. प्रेम, बांधिलकी या शब्दांना केवळ शब्दकोशात स्थान आहे. हे जग दुस-यासाठी त्रास सहन करणे हा मुर्खपणा समजते. मला याची कल्पना आहे. माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत " प्यार हुआ इकरार हुआ है... "

नाना को प्यार हो गया

1

Party नाना को प्यार हो गया

चांगले लिहिलेय.

2

चांगले लिहिलेय.

खत्तरणाक रे णाण्या

3

जबरा लेखण ... बराय "पंकज उधास" लाऊन बसला नव्हतास ... नाय तर लॅपटॉप दिवाण .. आणि घरातलं सामाण तरंगायला लागलं/लावलं असतंस wink

- निरमा

.....

4

मस्त, नेहमीप्रमाणेच अवलिया लेखन.

जाता जाता :
एखादी गोष्ट सुंदर असते म्हणून आपल्याला आवडतेच अस नाही, पण आवडणारी गोष्ट नेहमीच सूंदर भासते.

मस्तच लिहले आहेस रे नाना...

5

मस्तच लिहले आहेस रे नाना...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जितके सुंदर गाणे तितकेच सुंदर

6

जितके सुंदर गाणे तितकेच सुंदर लिखाण......प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीच्या अंतरंगात याच भावनांचे प्रतिबिंब असेल

नाना करते प्यार तुम्हीसे कर

7

"म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत "
नान्या तुझा लेख वाचुन आणि प्रतिसादासाठी लिंक शोधतान परत एकदा ...........


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

धड्पड

8

धडपडत पहिलं पाऊल टाकल्यानंतर एक्दम सूर गवसावा आणि चालत सुटाव तसं झालं लेखन.

आणि जर घरच्यांनी परवानगी नाही

9

आणि जर घरच्यांनी परवानगी नाही दिली तर काय करायचे? पळुन जायचे ?

कसले सॉलिड थ्रिलिन्ग ना Drunk

(विषय दिलेला नाही)

10

Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लेख उत्तम @चुचु - आता या

11

लेख उत्तम हास्य

@चुचु - आता या वयात कशाला हवय तुला थ्रील

चुकिचे असे टाचण दिले आहे

12

चुकिचे असे टाचण दिले आहे angery

बाबौ

13

आता धागा येणार 'श्रीमती माधुरीयांस'... पहिला प्रतिसाद मी टाकणार हां.

>>>आणि जर घरच्यांनी परवानगी

14

>>>आणि जर घरच्यांनी परवानगी नाही दिली तर काय करायचे? पळुन जायचे ?
हो चुचु......काहीही झाले तॠ साथ निभवाय्ची
म्हणून मग ती हिरॉईन्ही म्हणते

लाख मना ले दुनिया, साथ न ये छूटेगा
आके मेरे हाथों में, हाथ न ये छूटेगा
ओ मेरे जीवन साथी
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं
जहाँ भी ले जाएं राहें, हम संग हैं

क्या बात है !

15

क्या बात है !

अरे जरा फिल्मी लाईफ मधून

16

अरे जरा फिल्मी लाईफ मधून बाहेर या रे....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मी एकदा हे गाणे बासरीवर वाजवत

17

मी एकदा हे गाणे बासरीवर वाजवत होतो. शेजारची एक छोटी मुलगी( वय वर्षे ४/५...समजापसमज नकोत) आमच्या घरात खेळत होती. माझे बासरीवरचे गाणे ऐकून ती म्हणाले " काका मी ओळखले तू कुट्ले गाणे वाजवतोयेस ते........" मला इतक्या छोट्या मुलीला हे गाणी माहीत असावे याचे खूप आश्चर्य वाटले मी म्हणालो सांग बरं कोणते गाणे आहे ते.......... ती म्हणाली " हे गाणे ना त्या निरोधच्या झैरातीतले गाणे आहे "
मी एकदम गार आणि उलटापालटा झालो


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अग्गग्गगग्गा ! आच्रत

18

Laughing out loud

Laughing out loud

अग्गग्गगग्गा !

आच्रत


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

=))

19

Laughing out loud

माझी भाची पण म्हणते कि निळी

20

माझी भाची पण म्हणते कि निळी शाइ पुसणारा नॅपकिन तिला हवाय घाबरगुंडी

मस्त रे नाना.. छान लिहिलंय!!

21

मस्त रे नाना.. छान लिहिलंय!! हास्य

>>अरे जरा फिल्मी लाईफ मधून

22

>>अरे जरा फिल्मी लाईफ मधून बाहेर या रे....
अरे जिंदगी क्या है जानने के लिये जिंदा रहना जरूरी है.........फिल्मी वागत नाहीत माणस, पण
त्या जगात वावरल्याने ते संदर्भ येत असतील तर??

मस्त रे!!

23

मस्त रे!!

मस्त....

24

छान लेख लिहीला आहे... वाचुन खुप आठवणी जाग्या झाल्या....

नानुस

25

फार आतड्याने लिहिताय हो. अंतर्मनात कुठे तरी रुजून राहते. लिहू नका असे तरी कसे म्हणू? पण जिवाला त्रास होतो हे खरं.

असल काही लिहू नको

26

नाना असल काही लिहू नको! भय वाटतं.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शेवट मस्तच!

27

पण आता जग बदलले आहे. तो आणि ती पुर्वीसारखे राहिले नाहीत. आता ध्येय आधी ठरवुन त्यानुसार जोडीदार निवडला जातो. ध्येयापुर्तीला बाधा ठरणारे जोडीदार मेलेल्या उंदराला धरुन बाजुला फेकावे त्याप्रमाणे फेकुन दिले जातात, अडगळीत टाकले जातात. प्रेम, बांधिलकी या शब्दांना केवळ शब्दकोशात स्थान आहे. हे जग दुस-यासाठी त्रास सहन करणे हा मुर्खपणा समजते. मला याची कल्पना आहे. माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत " प्यार हुआ इकरार हुआ है... "

आवडले. हास्य

साबण

28

कुठला साबण वापरता हो नाना?